भुसावळत पाच दिवसांचे गणपती व गौराईंना निरोप

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज पाच दिवसांच्या घरगुती गणरारायसह गौराईंना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

भुसावळ शहरात घरगुती अशा पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. या सर्व मुर्त्या तापी नदीवर एका ठिकाणी जमा करून कृत्रिम हौदात त्यांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान आजच तीन दिवसाच्या माहेरी आलेल्या गौराईंना देखील निरोप देण्यात आला.

शहरातील महाराणा प्रताप विद्यालयाच्या गणपतीची मिरवणूक भुसावळकरांसाठी लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीमध्ये दिंडी, विठ्ठल रखुमाई ढोल पथक, झांज पथक, लेझीम अशा पारंपारिक वाद्य पद्धतीने नाचत व गुलालाची उधळण करत शेकडो विद्यार्थ्यांनी बाप्पा मोरया चा जयघोष करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तसेच अनेक कुटुंबांनी पाच दिवसांच्या गणेशाची स्थापना केली होती. त्यांनी देखील आज आपल्या गणरायाला तापी नदीवर निरोप दिला.

Protected Content