जळगाव प्रतिनिधी । ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर’ या अशा जयघोषणा गणरायाला आज निरोप देण्यात येत असून राज्यभरात विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील कान्याकोपर्यात गणरायाची स्थापना करण्यात आली होती. या वर्षाच्या गणेशोत्सववावर अतिवृष्टीचे सावट होते. या कालखंडात जोरदार पाऊस पडल्याने भाविकांचा विरस झाला असला तरी त्यांच्या उत्साहात जराही कमतरता नसल्याचे दिसून आले. दरम्यान, आज सकाळपासून गणेश विसर्जनास प्रारंभ झाला आहे. घरगुती आणि सार्वजनीक या दोन्ही प्रकारातील गणरायाला आता भावपूर्ण निरोप दिला जात आहे. सकाळपासून विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. रात्री उशीरा आणि काही शहरांमध्ये पहाटेपर्यंत मिरवणुका चालणार आहेत. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त राखण्यात आला आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/400807460632575/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1144423792613817/