गिरणा नदीच्या पुलावर मालवाहू चारचाकीत बिघाड ; दुतर्फा वाहतुकीची कोंडी

जळगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या बांभोरी गावाजळील गिरणा नदीच्या पुलावर आज सकाळी एक मालवाहू चारचाकीत झालेल्या बिघाडामुळे वाहतूकीची कोंडी होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या.

 

या संदर्भात अधिक असे की, गिरणा नदी पुलावर आज (मंगळवार) सकाळी ७ वाजेच्या सुमारास मालवाहू चारचाकी क्र. (एम.एच. १९ एस ४४३२) रस्त्याच्या माधोमध नादुरुस्त झाली. सकाळची वेळ असल्याने कंपनीत जाणारे व शालेय, महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची वाहणं मोठ्या प्रमाणात सुरु होती. परंतू मधोमध मालवाहू गाडी खराब झाल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अगदी शहरातील खोटेनगर ते महामार्गावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान, नादुरूस्त चारचाकी क्रेनच्या साह्याने बाजुला करण्यात आली. यानंतर दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली. यासाठी तालुका, पाळधी व महामार्ग पोलिसांनी वाहतूकीची कोंडी दुर करण्यासाठी परिश्रम घेतले.

Protected Content