सोलापूर जिल्हयात कार-ट्रक याच्या भीषण अपघात चार जण ठार; तीन जण जखमी

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगी गावाजवळ १३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन पुरुष, एका महिलेसह मुलाचा समावेश आहे. बबलेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढले. पोलिस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

विजयपूरहून जमखंडीकडे जाणाऱ्या कारला (केए २८ डी १०२१) सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकने (के. ए. १६ बी. ६४७२) धडक दिली. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. अर्जुन कुशलसिंग राजपूत, विनाथ सुनील पत्तार, पुष्पा रवि पत्तार आणि विजयपूर शहरातील रहिवासी मेघराज अर्जुनसिंग रजपूत या चौघांचा मृत्यू झाला. जयश्री अर्जुन रजपूत, नायरा अर्जुन रजपूत आणि प्रेमसिंग अर्जुन रजपूत जखमी झाले. हे सर्व विजयपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांना विजयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बबलेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content