ऑटो रिक्षाचा भीषण अपघात; ५ जण ठार तर ५ गंभीर जखमी

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये पुलावरून ऑटोचा भीषण अपघात झाला आहे. पुलावरुन ऑटो रिक्षा खाली कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून ते गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान ऑटो रिक्षा पुलावरुन कोसळल्याने गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. तर आज सकाळीच मुंबईच्या परळ पुलावर आज सकाळी 8 च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका दुचाकीला डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीवरील तिघे ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुली आणि एका तरुणाचा समावेश आहे.

मंगळवारी सकाळी परळ पुलावर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत तरुणांची नावे तनिष पतंगे (वय 24), रेणुका ताम्रकर (वय 25) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज वाहनावरुन येतो. बाईक डंपरवर इतक्या जोरदार धडकली की बाईचा समोरचा भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. डंपरला धडकल्यानंतर बाईवरील तिघेही जखमी झाले, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. या अपघातानंतर तिघांना तात्काळ केइएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भोईवाडा पोलीस हा अपघात कसा घडला याचा तपास करत आहेत.

Protected Content