फडणवीसांना बहुमत सिध्द करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

मुंबई प्रतिनिधी । आज शपथ घेतलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

काल रात्री उशीरा राज्यातील राष्ट्रपती राजवट उठविण्यात येऊन देेवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रीत केले. यानंतर सकाळी सव्वाआठच्या सुमारास फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

Protected Content