अपघातात मृत झालेल्या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील कासोदा ते आडगाव मार्गावर झालेल्या अपघातातील तिघा मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून या प्रकरणी कासोदा पोलीस स्थानकात कार चालकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, दिनांक २३ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कासोदा ते आडगाव मार्गावर भीषण अपघात झाला होता. या मार्गावरच्या खंडेराव श्रीपत पाटील पेट्रोल पंपाजवळ मारुती कार (एमएच- ०८, सी- ८४४०) व दुचाकी (एमएच- १९, बीएन- ७२९४) यांची धडक झाली होती. या अपघातात बबलू बच्चन भोसले (वय २२), बलदीप सुकटा पवार (वय ३५) व जोश-भाई उर्फ गोटू पिंटू चव्हाण (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर या तिघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कार-चालक गाडी सोडून गेल्याने त्याच्याविषयी माहिती मिळाली नाही. या प्रकरणी जितेश पवार यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content