जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो – रामदास आठवले

कोल्हापूर- आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था बंद करावी. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत,  असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

“आज आमच्या जातीवर अन्याय होत आहे. त्यामुळे जातीच्या आधारावरच आरक्षण असलं पाहिजे. तुम्ही जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो”, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशात कोणत्या जातीचा किती टक्का आहे, हे आता समजत नाही. प्रत्येक जातीची जनगणना होणे गरजेचे आहे. त्यामुळे २०२१ ची जनगणना जात निहाय होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.

 

Protected Content