हरीविठ्ठल नगरात वयोवृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । गुडघ्याच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात ७५ वर्षीय वयोवृध्दाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शंकर वामन सुर्यवंशी (वय-७५) रा. हरी विठ्ठल नगर जळगाव यांना गेल्या काही वर्षांपासून गुडघ्याचा आजार जडला होता. डॉक्टारांकडून औषधोपचार सुरू होते. मात्र त्रास कमी होत नव्हता. दुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एकटेच राहत होते. तर खालच्या घरात मुलगा ज्ञानेश्वर सुर्यवंशी हे राहत होते.

शंकर सुर्यवंशी यांनी गुडघ्याच्या आजाराला कंटाळून आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरात एकटे असतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. वडीलांना चहा व नास्ता देण्यासाठी गेलेले मुलगा ज्ञानेश्वर गेल्याने वडीलांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content