निवासी नायब तहसीलदारांनी कार्यभार न सोडल्याने चर्चेला उधाण

रावेर प्रतिनिधी । रावेर तहसिल विभागातील निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांची बदली होऊन वीस दिवस उलटले तरी सुध्दा त्यांना न सोडल्याने तर्क-विर्तक लढविले जात आहे. याबाबत वृत्त असे की, रावेर तहसिल विभागातील निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांची ३१ ऑक्टोबर रोजी भुसावळ तहसील कार्यालयात निवासी नायब तहसिलदार म्हणून बदली आहे. याला आज वीस दिवस उलटले परंतु त्यांनी अजुन सुध्दा पदभार सोडलेला नाही. बदली झालेल्या व्यक्तीना तात्काळ सोडण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी वि. पो. थोरात यांनी काढले होते. परंतु अजुन सुध्दा निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी पदभार न सोडल्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content