जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सैयद नियाज अली भैया फाऊंडेशनचे निदर्शने

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विधेयक कायदा रद्द करावा यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जळगावातील सैय्यद नियाज अली भैय्या फाऊंडेशनने पाठींबा देवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. 

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन नवे कृषी कायदे संमत केले आहे.  हे कायदे मुळातच देशभरातील शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता,  त्यांना विश्वासात न घेता हे विधेयके मंजूर केली आहे. या कायद्यांमुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती  व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, म्हणून हे सर्व कृती व तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही थांबविण्यात यावी तसेच  दिल्लीत  शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द होण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ सैय्यद नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे आज ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोरआंदोलन करून शेतकरी पाठिंबा जाहीर केलेला आहे.  याप्रसंगी केंद्र सरकारचे निषेध करण्यात आलेला आहे. 

याप्रसंगी सैय्यद अयाज अली नियाज अली,  शेतकरी संघटनेचे सचिन धांडे,  दिनेश लखारा,  सुरज गुप्ता, शफि ठेकेदार, सय्यद उमर, मुकेश परदेशी, शेख सलीम उद्दीन, मोहम्मद खान, इलियास नूरी,  सय्यद इरफान, शेख  शाकिब,  मोहमंद  फारूक तेली, शेख वसीम, शेख नजीर उद्दीन, सय्यद ओवेश अली, शेख नदीम, शेख नूर मोहम्मद, सय्यद मोइन आदी उपस्थित होते.

 

Protected Content