आदिवासी मुलींंवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी देण्याची मागणी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 21 at 6.14.02 PM

जळगाव, प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील दोन आदिवासी मुलींवर अत्याचार करण्यात आले आहेत. त्या मुलीना न्याय मिळून त्या नराधमास फाशी  व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यन्त आदिवासी एकता परिषदेतर्फ मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चात जिल्हाभरातील आदिवासी बांधवानी सहभाग घेतला होता. मोर्चाचे नेतृत्व आदीवासी एकता परिषदेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुनील गायकवाड, तंटा ब्रिगेड अध्यक्ष करण सोनवणे, जामनेर तालुका अध्यक्ष सुधाकर सोनवणे, लहू मोरे, सुनील वाघ, लहू मोरे, सुनील वाघ, महिला अध्यक्ष ज्योती सोनवणे, सुचिता मोरे, आशा सोनावणे यांनी केले.

Protected Content