कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समसुद्दिन रज्जाक पिंजारी असे मृत व्यक्तीचे नाव होते. स्वतः शेतामधील पिकाच्या माध्यमातून खर्चसुद्धा निघत नसल्याने आणि मागील दोन वर्षापासून सतत झालेल्या पावसामुळे जवळपास ७० टक्के नुकसान झाले असून यामध्ये हातावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांची फार मोठी तारांबळ झाली असून यामध्ये उदरनिर्वाह चालवण्यासाठी विविध ठिकाणाहून उसनवारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी यांनी शेवटी कर्जबाजारीपणाला कंटाळून समसुद्दिन पिंजारी यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी पाचोरा ग्रामीण रुग्णालय यांच्या खबरी वरून  १२५ / २१ सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी करत आहेत.

 

Protected Content