पिक विम्यामुळे त्रस्त शेतकर्‍यांची तक्रार मातोश्रीकडे रवाना

shivsena crop insurance

चाळीसगाव प्रतिनिधी । पिक विम्याची रक्कम भरूनदेखील भरपाईपासून वंचित असणार्‍या शेतकर्‍यांची माहिती अर्जाच्या माध्यमातून भरून शिवसेना पक्ष कार्यालय अर्थात मातोश्रीकडे पाठविण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभरातील पिक विमा पासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांची तक्रार असलेले फॉर्म भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच्या अंतर्गत तालुक्यातील बर्‍याच शेतकर्‍यांनी पिकाचा विमा काढून हप्ताही भरला आहे मात्र गेल्या वर्षभर दुष्काळ असूनही शेतकर्‍यांच्या संपूर्ण पिकाचे नुकसान झाले असताना विमा कंपन्यांनी या शेतकर्‍यांना कुठलेही नुकसान भरपाई दिले नाही. या सर्व शेतकर्‍यांची सविस्तर माहिती व तक्रार असलेले फार्म भरून घेऊन चाळीसगाव शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचेमार्फत शिवसेना भवन मुंबई येथे रवाना करण्यात आले आहेत.

यात तालुक्यातील ७०० पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने आपले फॉर्म भरून चाळीसगाव शिवसेना तालुका कार्यालयाकडे जमा केले आहेत. यासाठी शिवसेना तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण यांनी संपूर्ण ग्रामीण भागातील पदाधिकार्‍यांना मार्फत शेतकर्‍यांना आवाहन करून शेतकर्‍यांचे फॉर्म भरून घेतले. यामुळे तालुक्यातील विमाधारक शेतकर्‍यांना लवकरच विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम न दिल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांनी यासाठी चाळीसगावात चार दिवस थांबून मार्गदर्शन केले. तर उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ, जिल्हा उप समन्वयक महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव कलाने, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, विभाग प्रमुख दिनेश विसपुते, उपतालुकाप्रमुख हिम्मत निकम, उपतालुका प्रमुख दिलीप पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग बोराडे, अण्णा पाटील, प्रभाकर उगले, रोहित जाधव, नाना शिंदे, बापू लोणेकर, अनिल पाटील, सचिन ठाकरे, संदीप पाटील, बापू भोई, ऋषिकेश देवरे, नंदू गायकवाड आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

Protected Content