हवाई दलाचे आणि सैन्य दलाचे अभिनंदन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवली. जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वायुसेनेचे कौतुक केले आहे.

हवाई दलाचे आणि सैन्य दलाचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली गोष्ट झाली. अशाप्रकारचा कोणताही हल्ला भारत खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच भारत हा मजबूत देश आहे. मुंबईत नेहमी हाय अलर्ट असतो. जी काळजी घ्यायची ती घेत आहोत. सर्व यंत्रणांचे लक्ष आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.

Add Comment

Protected Content