रावेर तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा; भाजपाचे निवेदन

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावे अशी मागणीसाठी भाजपाने आज तहसीलदार देवगुणे यांना निवेदन दिले आहे.

भाजपा तर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर तालुक्यात २० व २१ रोजी वादळ व अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, मका अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्यासाठी भाजपातर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, परमेश्वर सोनार, संदीप सावळे, अजिंक्य वाणी, गणेश मराठे, लक्ष्मण पाटील, महेंद्र पाटील, सुधाकर पारधी, विनायक महाजन आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content