चाळीसगाव तालुक्यातील जवानाला वीर मरण

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील जवान सागर रामा धनगर यांना मणिपूरमधील सेनापती येथील चकमकीत वीर मरण आल्याचे वृत्त असून त्यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील सुपुत्र, सागर रामा धनगर यांना आज ३१ जानेवारी, २०२१ रोजी सेनापती (मणिपूर) येथे वीरमरण आल्याची बातमी आहे. सागर धनगर हे नोव्हेंबर, २०१७ मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. वीरजवान सागर यांचे पार्थिव १ फेब्रुवारी, २०२१ रोजी दुपारी १४.१० वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात येणार आहे. तेथून ते दुपारी १५.३० वाजता मुंबई येथील विमानतळावर सांयकाळी १९.१५ वा. पोहचेल. व त्यांनतर ते शक्यतो मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१ रोजी त्यांच्या मुळगावी आणण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Protected Content