केंद्र सरकारचे शेतकर्‍यांच्या विरोधात मृत्यूचे फर्मान- राहूल गांधी यांची टीका

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने आज पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकर्‍यांच्या विरोधात मृत्यूचे फर्मान जारी करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केली आहे.

राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळात कृषीसंबंधी विधेयकं मंजूर करण्यात आली. आवाजी मतदान घेत विधेयकं मंजूर करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकावर टीका केली जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली असून विधेयकाच्या रुपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचं फर्मान काढलं असल्याची टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जो शेतकरी जमिनीतून सोनं उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे आसू आणत आहे. राज्यसभेत कृषी विधेयकाच्या रुपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचं फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे”.

Protected Content