बेंगळुरु (वृत्तसंस्था) भाजपचे येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर आज 17 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
कर्नाटक निवडणुकीनंतर काँग्रेस, जेडीएसने आघाडी करत कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे कुमारस्वामींनी दीड वर्ष रडतखडत सरकार चालविले.मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्रास दिला जात होता. यामुळे गेल्याच महिन्यात काँग्रेसचे 12 आणि जेडीएसचे 3 आमदारांनी बंड करून राजीनामे दिल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.