किनगावात सहा ठिकाणी घरफोडी; नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील आत्माराम नगरात सहा ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघडकीला आले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर माहिती अशी की,  एन आर पाटील सर , संजय सयाजी पाटील ,  युवराज पोलाद चौधरी ( आत्मारामनगर ) , अर्जुन सुतार यांच्या घरातील साहित्यासह  जुन्या गावातील लिलाबाई बिऱ्हाडे यांच्या घरातुन १० हजार रुपये चोरीस गेले  एन आर पाटील यांचा  मुलगा हेमंत पाटील याला जाग आल्याने त्यांची चोरटयांशी झटापट झाल्याने संधी पाहुन अज्ञात चोरटयांनी पळ काढला असे सांगण्यात आले

 २१ मे च्या मध्यरात्रीच्या २ वाजेच्या सुमारास आत्मारात नगरातील सहा घराच्या मागील बाजूस असलेल्या घरात सर्व घरे घरातील मंडळी आपआपल्या घरात झोपेत असतांना अज्ञात चोरट्यांच्या टोळक्यांनी या घरांची मागील खिडक्या तोडुन घरात प्रवेश केला. मात्र घरातून काय चोरी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचे वृत्त कळताच यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. दरम्यान एकाच गावात एकाच ठिकाणी ५ ते ६  घरफोडीची करण्याची ही पहीलीच घटना आहे. या घटनेच्या मागे परप्रांतीय सराईत गुन्हेगारांची टोळी असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घरफोडीच्या घटनेमुळे किनगाव व परिसरातील राहणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content