मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्ष आता राज्यभरात ‘गाव तिथे शाखा’ ही संकल्पना राबविणार आहे.
शिवसेनेने शाखांच्या माध्यमातून आपल्या पक्षाची मोठ्या प्रमाणात बांधणी केली होती. आता याच संकल्पनेला भारतीय जनता पक्ष नव्याने राबविणार असल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान दोन शाखा सुरू करण्याचा निर्धार केला आहे. युवकांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
येत्या काळात मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर, विशेष करून तरूणाईला आपलेले करण्यासाठी शाखा ही संकल्पना यशस्वी होईल असे भाजपला वाटत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.