पवारांनी पुढाकार घेतल्यामुळे भाजपचे सरकार येणार नाही : दलवाई

Husain Dalwai Sanjay Raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता असल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार येणार नाही, असे काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले आहे. दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली.

आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी दलवाई यांनी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, दुसरीकडे मात्र, राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला सत्तेसाठी कौल दिला. त्यामुळे, त्यांनी एकत्रित येऊन लवकरात लवकर सत्ता स्थापित करावी, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.

Protected Content