एकनाथ शिंदे यांचा ‘बार’ भाजपनेच उडवला : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे हे भाजपमध्येच असून त्यांचा भाजपनेच ‘बार’ उडविला अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. एकनाथ शिंदेंचा गट लोकसभा निवडणुकांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असल्याचं पत्रकारानं विचारतच संजय राऊत म्हणाले की, शिंदे हे आताच भाजपमध्ये आहेत. तेव्हा कशाला जायला पाहिजे. त्यांच्या अंतवस्रांवर ‘कमळ’च आहे. त्यांना मुख्यमंत्री पद देखील त्यामुळेच मिळालं असून आताच ते भाजपचे गुलाम झाले असून गुलामांना स्वत:चं मत आणि स्वाभिमान नसतो, असंही ते म्हणाले.

याप्रसंगी संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी करत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मराठी माणसाची बेअब्रू केली त्यांनी शिवसेनेला ज्ञान देण्याचं काम करू नये. मुंब्र्याला आम्ही गेलो, हजारों शिवसैनिक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच संघर्ष टाळला. तुमच्याकडे जर सत्ता नसती आणि पोलीस नसते तर चित्र वेगळं दिसलं असतं. दिवाळी आहे आम्ही संयम राखला. त्याचे त्यांनी उपकार मानले पाहिजेत असे राऊत म्हणाले.

दरम्यान, आपल्या विरोधकांना काम करू द्यायचं नाही, असा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. मराहाष्ट्र, राजस्थान, प. बंगाल, छत्तीसगड जिथे भाजपची सत्ता नाही आणि जिथे २०२४ मध्ये भाजप पराभूत होणार आहे तिथे भाजप हेच करत आहे. पण लालू यादव आणि त्यांचं कुटुंब मजबूत आहे, ते तुटणार नाहीत. आमच्या एकनाथ शिंदेंप्रमाणे ते गुडघे टेकणार नाहीत. ते लढत राहतील. लालू यादव-तेजस्वी यादव यांची लढाई सुरू असतील तेव्हा आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत, असं राऊत यांनी नमूद केले.

Protected Content