मोठी बातमी : वाघाच्या कातडीसह तस्करांची टोळी अटकेत !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथील टोल नाक्यावर कस्टम खात्याने केलेल्या कारवाईत वाघाच्या कातडीसह याची तस्करी करणार्‍या टोळीला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नशिराबाद टोल नाका येथे वाघांच्या कातडीसह एक टोळी आल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. यानुसार, सापळा लावला असता दोन मोटारसायकलींवरून एकूण पाच जण जात असतांना त्यांना अटक करण्यात आली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कडून वाघाची कातडी जप्त करण्यात आली. या वाघाची शिकार कुणी व कशी केली याची माहिती समजली नाही. मात्र वाघ हा दुर्मीळ प्राणी असतांना त्याची कातडी जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या वाघाची शिकार मध्यप्रदेशात करून याची कातडी महाराष्ट्रात विकण्यासाठी आणली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, वन खात्याच्या अंतर्गत असलेल्या कस्टम विभागाने या संदर्भात पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये अजवर सुजात भोसले ( वय ३५, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर); कंगनाबाई अजवर भोसले (वय ३०, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर); रहीम_ रफीक पवार (रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर); तेवाबाई रहीम पवार (रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर); मोहंमद अतहर खान ( वय ५८, रा भोपाळ, मध्यप्रदेश) या पाच आरोपींचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात वन्य खात्याच्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content