Home राजकीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! ५ आश्रमशाळा माध्यमिक तर १९ शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाचा...

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! ५ आश्रमशाळा माध्यमिक तर १९ शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत, तर 19 माध्यमिक आश्रमशाळांची उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

 


Protected Content

Play sound