भुसावळातील खून प्रकरणी चौथ्या आरोपीला कोठडी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील श्रीराम नगरात झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणात अजून काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा श्रीराम नगरातील विलास दिनकर चौधरी या तरुणावर पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला व गोळीबार करुन त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भुसावळातील अक्षय प्रकाश न्हावकर (वय २३ रा. चक्रधर नगर), अभिषेक राजेश शर्मा (वय २१ रा. चमेली नगर) आणि आकाश गणेश पाटील (वय २१ रा. नारायण नगर) यांना अटक केली होती. यानंतर या प्रकरणात चौथा आरोपी मयूरेश राजेश महाजन (वय २० रा. दत्तनगर, भुसावळ) यास अटक झाली. शनिवारी न्यायालयाने त्यास २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.

या तरुणाच्या खून प्रकरणात वापरलेले पिस्तूल पोलिसांनी श्रीराम नगरातील एका स्थळावरुन हस्तगत केले आहे. तर या प्रकरणात अजून अन्य आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल मोरे तपास करत आहेत.

Protected Content