भारतीय सैनिकांना राख्या पाठवून विद्यार्थीनींचा अनोखा उपक्रम

erandol pratinidhi

एरंडोल प्रतिनिधी । येथील ग्रामीण उन्नती मंडळ संचलित माध्यमिक विद्यमंदिर शाळेच्या आर.एस.पी.च्या विद्यार्थिनींनी ज्या सैनिक बांधवामुळे आपण सुरक्षित आहोत. जे देशासाठी सिमेवर डोळ्यात तेल घालुन पहारा देतात अशा सैनिकांना राख्या व पत्र पाठवले.

आर.एस.पी. शिक्षिका सविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी राख्या बनविल्या आहेत. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.

Protected Content