बाल संगोपन योजनेसाठी नागरीकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्य शासनाची बाल संगोपन योजनाचा लाभ मिळवण्यासाठी नागरीकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

तालुक्यातील ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई व वडील दोन्ही ही नसतील अशा बालकांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळतो. ० ते १८ वयोगटातील बालकांना या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन मुलांना ही लाभ दिला जातो.

एका मुलांसाठी ११०० रुपये प्रतिमहिना ( एका वर्षाला १३२००/- रु मिळतात) वय १८ पुर्ण होईपर्यत दर महिन्याला रक्कम मिळते.

सदरचा प्रस्ताव सादर करण्यासाठी लागणारी खालील दिलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.

१)योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जासोबत

२)आधार कार्ड झेराँक्स पालकांचे व बालकांचे

३)शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट

४)तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला

५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र (मृत्युचा दाखला)

६) पालकाचा रहिवासी दाखला.

७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स

८) मृत्यूचा अहवाल.

९) रेशन कार्ड झेराँक्स

१०) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा फोटो ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो ) मुलांचे पासपोर्ट फोटो २,११) पालकाचे पासपोर्ट फोटो, सदर सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन अर्ज करता येतो.

ही योजना मंजूर कोण करते. हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजुर करते. जिल्हा परिषद शाळेत व महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईट आत्ताच शाळेतून काढून ठेवावा.या योजनेचा लाभ घ्या व १८ वर्षापर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी चिंता मुक्त व्हा.

सदर योजना अनेक वर्षा पासुन चालु आहे .पण अनेक पालकांना ही योजना माहीत नाही. म्हणुन आपण हा मेसेस इतर नंबर व ग्रुपवर सामाजिक भुमिकेतुन पाठवावा व अनेक निराधार, गरजु बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल अधिक माहीती साठी संपर्क करु शकता अशी माहीती जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन संदीप पाटील (सोनवणे), सदस्य-बाल कल्याण समिती (बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट)-जळगाव सदस्य-महिला शक्ती केंद्र जळगाव यांनी दिली आहे.

Protected Content