आता म्हणे…अबकी बार चार सौ पार !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भाजपने आता आगामी निवडणुकीसाठी अबकी बार चार सौ पार ही नवीन घोषणा वापरण्याची तयारी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार मोदी सरकार ! ही घोषणा प्रचंड गाजली होती. याच घोषणेच्या माध्यमातून देशभरात परिवर्तनाचा जागर करून सत्ता संपादन करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला होता. आता आगामी निवडणुकीसाठी याच प्रकारच्या जबरदस्त पकड घेणार्‍या कॅचलाईन्सचा शोध घेतला जात आहे. या अनुषंगाने पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी आता अबकी बार चार सौ पार! ही नवीन घोषणा शोधून काढली आहे. त्यांनी ट्विटरवर याचा हॅशटॅगदेखील वापरण्यास प्रारंभ केला आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये भूमिका मांडतांना अनुराग ठाकूर म्हणाले की, अलीकडच्या काळात भाजपला काही राज्यांमध्ये अपयश आले असले तरी लोकसभेत आमचा पक्ष दमदार कामगिरी करणार आहे. यावेळी आमचा पक्ष विक्रमी कामगिरी करणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. दरम्यान, ठाकूर यांच्या या दाव्यावरून सोशल मीडियात तुफान चर्वण सुरू झाले आहे. अनेकांनी त्यांना सपोर्ट केला असला तरी बर्‍याच जणांनी त्यांच्या या दाव्याची खिल्लीदेखील उडविली आहे.

Add Comment

Protected Content