राजीनामा दिला म्हणून अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही : गिरीश महाजन

girish mahajan

 

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे याची त्यांच्या घरच्यांना देखील माहिती नाही. अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावरील कारवाई थांबणार नाही, असे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन स्पष्ट केले आहे.

 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही. मात्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने ते अस्वस्थ झाल्याने त्यांनी तसा निर्णय घेतला असावा, असे खुद्द शरद पवारांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनाही अजित पवारांच्या निर्णयाचा धक्का बसला आहे.गिरीश महाजन यांनी अजित पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.

Protected Content