धक्का मारल्याचा जाब विचारल्यावरून तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धक्का मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणाला दोन जणांनी जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील पेठ भागात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील पेठ भागात गणेश दत्तू कोळी (वय-३२) हा तरूण वास्तव्याला आहे. सोमवारी २५ सप्टेंबर रेाजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश कोळी हा घरासमोर उभा होता. त्यावेळी गल्लीत राहणारा रोहित गोविंदा नाथ याने त्याला धक्का दिला. याचा जाब गणेश कोळी याने विचारला. याचा राग आल्याने रोहित गोविंदा नाथ आणि विपूल गोविंदा नाथ रा. पेठ भाग, नशिराबाद ता.जि.जळगाव यांनी गणेशला पकडून जमिनीवर पाडले व लाथबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गणेश कोळी याने नशिराबाद पोलीसात धाव घेतली. नशिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहित गोविंदा नाथे आणि विपुल गोविंदा नाथ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

Protected Content