लग्न समारंभानंतर घरी येत असताना बसच्या धडकेत महिला ठार

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मध्य प्रदेश राज्यातील बंभाळा येथे लग्न समारंभासाठी गेलेल्या आरती संदीप पाटील यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. लग्न व ओवाळनीचा कार्यक्रम आटोपून आरती पाटील मोटर सायकलवरून घरी येत असताना महामंडळच्या (एम १४ बीटी ३९१६) नंबरच्या बस चालकाने मोटर सायकलला धडक दिली. या अपघातात मोटर सायकलवर मागे बसलेल्या आरती पाटील यांचा रावेर शहरानजिक जागीच मृत्यू झाला.

आरती पाटील यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बस आणि मोटर सायकलच्या धडकेनंतर बसला रावेर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून, अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.आरती पाटील यांच्या निधनाने बामनोद गावात शोककळा पसरली आहे.

Protected Content