मालवाहू वाहनाच्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू; इतर प्रवाशी जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रक्टर आणि मालवाहू वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात ५३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मलाबाई गोकुळ चौधरी वय ५३ रा. झामी चौक, अमळनेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, चोपडा ते अमळनेर रोडवरील पातोंडा गावाजवळील विसपुते पेट्रोल पंपासमोररून मालवाहू रिक्षा क्रमांक (एमएच १९ बीएम ४९८७) ही अमळनेरकडे जात असतांना समोरून येणाऱ्या विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघात मालवाहून रिक्षा पलटी झाली. यात रिक्षातील सुनिल संदानशिव जोशी, भावेश कैलास मिस्तरी लिलबाई ओंकार कोळी, मंगलाबाई निंबा महाजन, अनिला रामाराम महाजन सर्व रा. अमळनेर हे जखमी झाले तर निर्मलाबाई गोकुळ चौधरी वय ५३ रा. अमळनेर या महिला जागीच ठार झाल्या. हा अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर घेवून पसार झाला होता. याप्रकरणी रविवारी २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव हे करीत आहे.

Protected Content