विद्यार्थ्याचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याचा गिरणा नदीपात्रात पोहतांना बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हर्षल संजय तावडे (वय-१७) रा. नांद्रा ता. पाचोरा असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. आज रविवारी, २ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत माहेजी येथील गिरणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला. पोहत असतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांना धाव घेतली. हनुमंतखेडा येथील नावेकरांनी शोधा घेवून मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. याबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

मयत हर्षल हा दहावी पास करून जळगाव येथे बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. संजय अवचीत तावडे यांना दोन मुले होती. हर्षल हा लहान होता. वडीलांचा शेतीचा व्यवसाय अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या शाळकरी मुलांचा अश्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. हर्षल हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Protected Content