धरणगाव शिवसेना व मोरया फाउंडेशनतर्फे गरजूंना चहा-पान व फळ वाटप !

 

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणुच्या संकटाने देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू शकणार नाहीय. या परिस्थितीत हातावर पोट असलेल्यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अशा गरजवंतांची उपासमार होऊ नये यासाठी शिवसेना शहर शाखा व मोरया फाउंडेशनच्या वतीने शहरातील विविध भागात अन्नदान करण्यात येत आहे.

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील, व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, मोरया फाऊंडेशनच्या वतीने चे अध्यक्ष संजय वामन चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांचा वतीने लॉक-डाऊन असल्यामुळे ज्यांचे उदरनिर्वाह हातावर आहे, अशा गरजूंना आज चहा-पान व फळ वाटप करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, सतीश बोरसे, शिवसेना तसेच अत्यावश्यक सेवेचे कार्यकर्ते समाधान पाटील (भासा), गोपाल पाटील, गोपाल चौधरी, विशाल चौधरी, पराग चव्हाण, समाधान पाटील तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content