चिंता करायची नाही, सरकार निर्माण होणारच : शरद पवार

4Sharad 20Pawar 201 3

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायची नाही. निवडणुकीला सामोरे जावे लागणार नाही. सरकार निर्माण होणारच,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आमदारांना आश्वस्थ केले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची आज आमदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना त्यांनी मध्यावधी निवडणुका होणार नाही सांगत सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. आमदारांशी संवाद साधताना पवार म्हटले की, राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायचे नाही सांगितले. तसेच आमदारांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार नाही सांगत तुमच्या मतदारसंघांमध्ये जाऊन जनतेची काम करा असा आदेश त्यांनी आमदारांना दिला आहे. आमदारांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख नेत्यांवर देण्यात आली आही.

Protected Content