Home राजकीय राष्ट्रवादी विलीनीकरणावर मोठा ट्विस्ट ; फडणवीसांची थेट अट

राष्ट्रवादी विलीनीकरणावर मोठा ट्विस्ट ; फडणवीसांची थेट अट


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर थेट भूमिका मांडत एक महत्त्वाची अट समोर ठेवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार होते, असे दावे होत असतानाच फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला वेगळी दिशा मिळाली आहे.

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. खासदार शरद पवार आणि आमदार जयंत पाटील यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते, असा दावा केला आहे. यासाठी अनेक बैठका झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी बारामती येथे झालेली बैठक ही केवळ जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भात होती, असे स्पष्ट करत शरद पवार यांचा दावा फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर विलीनीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर थेट भाष्य केले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी शरद पवार गटाकडून केले जाणारे दावे अप्रत्यक्षपणे खोडून काढले. अजित पवार आणि आमच्यात सातत्याने चर्चा होत असत. जर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू असती, तर अजितदादांनी आम्हाला त्याची माहिती दिली असती, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र पक्ष असून त्या पक्षाचे निर्णय तेच घेतात, असे स्पष्ट करत त्या पक्षाच्या अस्तित्वावरही ठाम भूमिका मांडली.

यावेळी फडणवीस यांनी एक महत्त्वाची अटही समोर ठेवली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार असेल, तर त्याबाबत आधी आमच्याशी चर्चा झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. जर असे एकत्रीकरण ठरले असते, तर त्याची माहिती आम्हाला आधीच दिली गेली असती, असेही ते म्हणाले. या वक्तव्यामुळे भाजपाची भूमिका स्पष्ट झाली असून सत्ताधारी आघाडीतील समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह सत्तेत सहभागी आहे, तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेत मोठे राजकीय गणित सामोरे येणार आहे. विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार गटाला सत्तेबाहेर पडावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.


Protected Content

Play sound