जाणून घ्या ! आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर प्रवासी वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली. आज रात्री १२.०० वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. दुसरे महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे-

१. आगरी समाजासाठी महामंडळाची घोषणा
२. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम
३. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
४. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता
५. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
६. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
७. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी
८. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य
९. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० राबविणार
१०. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
११. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ
१२. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
१३. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे
१४. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना
१५. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा
१६. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट
१७. ‘उमेद’साठी अभ्यासगट
१८.कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

Protected Content