आसाममध्ये राज्यसभेच्या दोन जागांवर भाजपचा बिनविरोध विजय

गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आसाममधील सत्ताधारी पक्ष भाजपने राज्यसभेच्या दोन जागा जिंकल्या आहेत. निवडणूक न लढवता दोन जागा पक्षाला मिळाल्या आहेत. सोमवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, त्यामुळे राज्यात होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे फक्त दोनच उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजपच्या त्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे दोन उमेदवार रामेश्वर तेली आणि मिशन रंजन दास यांना गुवाहाटीमध्ये रिटर्निंग ऑफिसर राजीव भट्टाचार्य यांनी त्यांचे प्रमाणपत्र दिले होते. भट्टाचार्य यांनी या प्रकरणी सांगितले की, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते दोनच उमेदवार होते, तेली आणि दास या दोघांनाही कोणतीही स्पर्धा न करता विजयी घोषित करण्यात आले आणि त्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Protected Content