संवाद यात्रेची गौरखेडा येथुन सुरुवात; धनंजय चौधरी यांनी गावकऱ्यांनी साधला संवाद

सावदा/रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनंजय चौधरी यांच्या संकल्पनेतून कृतज्ञता संवाद यात्रेची सुरुवात सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या गौरखेडा गावापासून झाली. ही यात्रा गौरखेडा, लोहारा, चिंचाटी, जानोरी अशी भेट देत पुढे प्रस्थान करत आहे. जुन्या वाडवडिलांचा वारसा जोपासण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले.

यात्रेदरम्यान, आदिवासी मुलांना शिक्षण मिळाले असले तरी गावातील समस्या मांडण्यात आल्या. गावकऱ्यांनी धनंजय चौधरी यांच्याकडे शाळेसाठी कॉम्प्युटर प्रिंटर, वाचनालय, पाण्याची टाकी अशा सुविधांची मागणी केली. त्याचप्रमाणे महिला बचत गटाच्या समस्या आणि गावासाठी दोन किलोमीटरचा रस्ता मंजूर झाला असून पुढील सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मांसोर मिरखा तडवी, गंभीर तडवी, महिला बचत गटाच्या सरपंच सुलताना यासीन तडवी, यासीन मन्सूर तडवी, युसुफ रमजान तडवी (अध्यक्ष वन समिती), उस्मान सुपडू तडवी, रज्जाक रमजान तडवी, सलीम रमजान तडवी, गंभीर हैदर तडवी, तसेच धनंजय भाऊ यांनी स्वयम् रोजगार निर्मितीसाठी नव-नवीन योजनांचा विचार मांडला आणि गावातील अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले.

जानोरी गावात विहिर पूजन सरपंच सुलताना यासीन तडवी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चिंचाटी गावात पंप पूजन रशीद तडवी, छोटू तडवी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील स्वर्गीय आणि लोकांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण रेहमान तडवी, युसुफ तडवी, मन्सूर तडवी, गंभीर तडवी, हाबिब तडवी, मुबारक तडवी, असलंम तडवी ग्राम पंचायत सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कृतज्ञता संवाद यात्रा पुढील सहस्त्रलिंग, लालमाती, कुसुंबे बुद्रुक, कुसुंबे खु या गावांमध्ये पोहचणार असून तेथेही जनतेशी संपर्क साधणार आहे.

Protected Content