काश्मिरातील वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा ठाकरे गटाकडून निषेध

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काश्मिर येथील दहशतवादी हल्यात जवान शहीद होत आहेत. याचा निषेध करून याबाबत केंद्र शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन तालुका शिवसेने तर्फे तहसीलदार यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद केले की जम्मु काश्मिर मध्ये सिमेवर वारंवर होणाऱ्या दहशतवादी हल्यात जवान शहीद होत आहेत. सदर बाब गंभीर आहे. मात्र केंद्र सरकार याबाबी कडे दूर्लक्ष करीत आहे. यामुळे केंद्र सरकारचा तालुका शिवसेने तर्फे घोषणा देऊन निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे व अप्पर तहसीलदार मयुर कळसे यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना ( उबाठा) समन्वयक प्रल्हाद महाजन, उपजिल्हा प्रमुख योगिराज पाटील, अशोक शिंदे, रविंद्र पवार, राष्ट्रवादीचे अशोक पाटील, अविनाश पाटील, सुरेश शिंदे, संतोष महाजन, तालुका प्रमुख नितीन महाजन, शहर प्रमुख राकेश घोरपडे, माजी नगरसेवक सुधाकर महाजन, मुबारक तडवी, निलेश महाजन, मुकेश पाटील, भाऊलाल महाजन, गोपाल सुतार, दिपक महाजन , शेख लतिफ, प्रदीप पाटील, राजु लोहार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content