![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/advt-3.jpg)
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बांभोरी गावातील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार ६ जून रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. जयेश सुभाष तायडे वाय-३५, रा. बांभोरी ता. धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/Half-Page-1.jpg)
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जयेश तायडे हा तरूण आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात वास्तव्याला होता. खाजगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दोन दिवसांपासून त्याची पत्नी सोनीबाई ह्या दोन्ही मुलांसोबत माहेरी आमोदा येथे गेलेल्या होत्या. त्यामुळे जयेश हे घरी एकटेच होते. दरम्यान बुधवारी ५ जून रोजीच्या मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी सोनी यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचे गावात राहणारे नातेवाईक अशोक नन्नवरे यांना फोन करून घरी जाण्याचे सांगितले. त्यानुसार अशोक नन्नवरे हे घरी गेल्यावर जयेश तायडे याने गळफास घेतल्याचे खिडकीतून दिसून आले. यावेळी त्यांनी तातडीने दरवाजा तोडून आत प्रवेश करत खाली उतरवत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंतिम मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात आईवडील लहान भाऊ विशाल, पत्नी सोनीबाई, मुलगा देवेश आणि मुलगी गुंजन असा परिवार आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/second-advt-ap.jpg)