मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिंदे गटात हिंमत असेल तर राजीनामा द्यावा आणि नव्याने निवडणूकीला सामोरं जावे असे आव्हान खा. संजय राऊत यांनी ओपन चॅलेंज दिले आहे.
शिंदेगटाकडे कितीही आमदार असले तरी राजीनामे द्यायचे आणि आपल्या मतदार संघात जाऊन निवडणूका लढवून जिंकून दाखवा असे खुलं चॅलेंज संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, गृवाहटीला बसून आम्हाला सल्ला व मार्गदर्शन करू नका, शिवसैनिक रत्यावर उतरले आहे. आमच्या एका इशाराची वाट पाहत आहे. आम्ही आमचा संय्यम सोडलेला नाही. बाळासाहेबाचे भक्त असे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत नाही.
संजय राऊत म्हणाले की, ते लोक कोणत्या नशेत आहेत ते माहिती नाही. त्यांना खाण्यात अफू, चरस, गांजा देतात काय कुणास ठाऊक. अडीच वर्षांपासून सत्तेत आहेत. सगळे मंत्री बनून बसले आहेत. मलईदार खाती घेऊन बसले आहेत. आता अचानक त्यांना साक्षात्कार झालाय का? असा सवाल राऊतांनी केला आहे.