मराठा समाजाने ईडब्लूएसचं आरक्षण घ्यावं — संभाजी ब्रिगेड

रत्नागिरी : वृत्तसंस्था । “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाची दिशाभूल केली ईडब्लूएसचं आरक्षण मराठा समाजाने घ्यावे”, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली. चिपळूनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते

५० टक्के आरक्षणामध्ये ओबीसी समाजाला केवळ १९ टक्केच आरक्षण मिळतं आणि यामध्ये मराठा समाजाला समाविष्ट केलं तर ओबीसी समाजावर अन्याय होईल. कुठलाही राजकीय पक्ष ५० टक्के आरक्षणाचं समर्थन करत नाही असेही ते म्हणाले . .

“मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकाने मराठा समाजाची दिशाभूल केली. भाजपने मराठी आंदोलनाचं केवळ राजकारणच केलं. ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण होईल, असं भाजपने बघितलं. संभाजी ब्रिगेडने ईडब्लूएसचं आरक्षण मिळावं, अशी मागणी केलीय. एसीबीएसचा कायदा राज्य सरकार करतेय. पण तो अधिकार राज्य सरकारला नाही. ओबीसींचा आयोग केवळ शिफारस करु शंकतं”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले

“शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांच जोरदार आंदोलन सुरु आहे. भाजप सरकार हे केवळ शेतकरी विरोधी नाही तर मानवता विरोधी आहे. भाजपने व्यापार-उद्योगाला पोषक आणि जागतिकरणाच्या तरतुदीप्रमाणे कायदे तयार केलेत. लोकशाहीत लोकांना जर हे कायदे नको असतील तर या कायद्यांसाठी अट्टाहास का?”, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला.

“शेतकऱ्यांच्या बाजूने संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल आणि संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने सरकारला येत्या काही दिवसात उत्तर देईल”, असा सूचक इशारा प्रवीण गायकवाड यांनी केंद्र सरकारला दिला.

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती. आता थेट ८ मार्चपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. मराठा आरक्षणाची तारीख वारंवार पुढे ढकलल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Protected Content