निवासी उपजिल्हाधिकारी हल्ला प्रकरणातील ६ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरापासून तरसोद गावाजवळ निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या गुन्ह्यातील १६ जणांना अटक करण्यात आली असून त्याच्यावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अटकेतील ६ संशयित आरोपींना मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती श्रीमती एम.एम.बडे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे तरसोद फाट्याजवळ मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाळूचे डंपरवर कारवाई करण्यासाठी गेले असतांना अचानक त्यांच्यावर वाळूमाफियांकडून जीवघेणा हल्ला चढविण्यात आला. या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर मारेकरी फरार झाले होते. या गंभीर गुन्ह्यातील अटक करणाऱ्या आलेल्यांपैकी पवन उर्फ प्रसाद कैलास कोळी (वय-२३, रा. साकेगाव), प्रवीण सुकलाल चौधरी (वय-२५) निखिल गोपाल कच्छवा (वय-२०, दोघे रा. पिंप्राळा), मंगेश यशवंत पानपाटील (वय-२५, रा. सावखेडा), जगदीश प्रमोद तायडे (वय-१९, रा. साकेगाव), अजय मूलचंद चौधरी (वय- २८, रा. पिंप्राळा) यांची मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यांना दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडी रवाना करण्याचे आदेश दिले आहे.

Protected Content