चाळीसगावातून २१ वर्षीय मनोरूग्ण तरुण बेपत्ता!

 

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । घरातून बाहेर फिरायला गेलेला २१ वर्षीय मुलगा अद्यापपावेतो घरी न परतल्याने नातेवाईकांसह परिसरात शोधाशोध केली. मात्र मिळून न आल्याने शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, वैभव बळीराम पाटील (वय-२१) रा. शास्त्रीनगर, गजानन वाडी, ता. चाळीसगाव येथे आई-वडील‌ व भाऊ यांच्यासहित वास्तव्यास आहेत. वैभव हा मनोरूग्ण आहे. दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वैभव हा बाहेरून फिरून येतो असे आपल्या वडिलास सांगून गेला होता. परंतु रात्री ९ वाजेपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांकडे, शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, घाट रोड परिसरात शोधाशोध केली असता मिळून आला नाही म्हणून सागर बळीराम पाटील (मोठा भाऊ) यांच्या सांगण्यावरून शहर पोलिस ठाण्यात आज १६ रोजी सकाळी ११:२३ वाजता हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे. वैभवाची ओळख पटावी यासाठी उजव्या हाताच्या कामेवर वैभव असे नाव मराठीत गोंदलेले आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सफौ./८७६ धर्मराज पाटील हे करीत आहेत.

 

Protected Content