मालाडमध्ये घरांवर भिंत कोसळून १६ ठार

malad durghatna

मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतांनाच मालाडमध्ये घरांवर भिंत कोसळून १६ जण ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, मुंबईसह परिसरात सुरू असणार्‍या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज या महानगरातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी सुरू असल्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मालाडमधील कुरार या भागात काही घरांवर भिंत कोसळून झालेल्या अपघातामध्ये १६ जणांचे मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. ढिगार्‍याखाली अजून काही जण अडकल्याची शक्यता असून यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास प्रारंभ केला आहे.

Protected Content