Home Cities जळगाव हतनूरचे १६ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूरचे १६ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
128


जळगाव प्रतिनिधी | तापी नदीवरील हतनूर धरणाचे १६ दरवाजे उभारण्यात आले असून यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे सोळा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात ४५८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.


Protected Content

Play sound