हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गाय व वासरु ठार

 

पाचोरा, प्रतिनिधी ।तालुक्यातील नांद्रा परिसरात वन्य प्राण्याने शेतात बांधलेल्या गाय व वासरू यावर रात्री हल्ला करून ठार मारल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नांद्रा गावालगत शेतकरी उत्तम कौतिक पाटील यांच्या शेताच्या बांधावर चार ते पाच जनावरे बांधलेली होती. काल रात्री या जनावर एका हिस्त्र प्राण्याने हल्ला करून त्यातील गाय व वासरूचा फडशा पडला. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात रात्री वीज सुरु राहत असल्याने व पाटाला मोजके दिवस पाणी येत असल्याने शेतकरी रात्री-बेरात्री सिंचनासाठी शेतात जात असतात. यावेळी हिंस्त्र प्राण्याच्या पाऊलखुणा, तसेच चमकणारे डोळे दिसत असल्याचे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पहावयास मिळत आहे. यातच या हिंस्त्र प्राण्याने गाय व वासरूस  हल्ला करून ठार मारल्याने त्यांचात चिंतेचे वातावरण पहावयास मिळत आहे. या हिंस्त्र प्राण्याचा  बंदोबस्त करण्यात यावा तसेच वन्य प्राण्याद्वारे पिकांच्या केलेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

Protected Content