मुंबई (वृत्तसंस्था) भारतातील अस्पृश्यता निवारणाविषयी केलेल्या विधानावरून ‘हा डोक्यावर पडला काय?,’ अशा शब्दात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर टीका केली आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात देशातील अस्पृश्यता निवारणाबाबत भाष्य केले होते. कार्यक्रमात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असल्याचे म्हटले होते. परंतू यावर जितेंद्र आव्हाड यांनी “अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे… हा डोक्यावर पडला काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही,” असे ट्विट करत टीका केली आहे.